रविवार, २१ जून, २०२०

पिढ्यान पिढ्या नावात उरत असतो बाप*

पितृदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!💐💐🙏🏻
या निमित्ताने माझी एक रचना
कृपया,

https://youtube.com/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर  *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर  नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*

पिढ्यान पिढ्या नावात उरत असतो बाप
कुळाच्या भल्यासाठीच भरत असतो माप

जीवघेण्या खेळ सारा दिसत नसतो घाव
काळजात जखमांचा घोकत असतो गाव

हसत वादळात पिटाळत असतो नाव
घामाघूम होतो तरी काढत असतो धाव

मनगटात जरीही दिसत असलं बळ
कुणाला दिसत नाही थेट रक्तातील कळ

पिलांमुखी चाऱ्यासाठी  घोर पोसतो उरात
धाप टाकत असतो जो संकटांच्या पुरात 

स्मशानात जळणाराच नसतो बाप खरा
मुलांसाठी वाहत असतो झुरणारा झरा 

*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com  
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

शनिवार, २० जून, २०२०

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ऑनलाईन व्यवहार हाच पर्याय

कोरोना नावाच्या व्हायरसने जगभर पसरायला सुरवात केली. आणि काही कालावधीतच भारतीय उपखंडात सुद्धा कोरोनाचा संसर्ग पसरू लागला. संसर्गाला आळा घालण्यासाठी शासनाने लॉकडाऊनची घोषणा केली. हातावर पोट असणारे गोरगरीब, मजुरांचा रोजगार थांबला. त्यांची उपासमार होऊ नये म्हणून लोककल्याणकारी शासनाने रेशनमध्ये स्वस्त दरात रेशन तसेच जनधन योजने अंतर्गत उघडण्यात आलेल्या बँक खात्यावर प्रत्येकी पाचशे रुपये असे तीन महिन्यात दरमहा जमा करणार असल्याची घोषणा केली.
 घोषणा केल्याप्रमाणे नागरिकांच्या जनधन खात्यांमध्ये पाचशे रुपये रक्कम जमा झाली. रुपया सुद्धा गाडीच्या चाकाप्रमाणे वाटणाऱ्या गरीब जनतेला तो फार मोठा आधार ठरला. मग काय लोकांनी बँकांसमोर रक्कम काढण्यासाठी सकाळपासून मोठ्या मोठया रांगा लावल्या असल्याचे दूरचित्रवाहिन्यांवर दाखवले गेले. यातून बेरोजगारी व गरिबीचे धक्कादायक चित्र समोर आले. हा प्रकार अतिशय धोकादायक असून कोरोना व्हायरसला आयतच निमंत्रण ठरू शकणारा आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर असावे, प्रत्येकाने तोंडावर मास्क किंवा स्वच्छ रुमाल बांधावा. मात्र सहजपणे ऐकतील ते  लोकं कसले. शिवाय कमी शिक्षण, आडमुठेपणा या प्रमुख अडचणी आहेतच. नाहक बाहेर पडून गर्दी करण्यात सुद्धा काही आडदांड समाजकंठकांना थ्रिल वाटत असावी.
 बँकांसमोरील गर्दी, लांबच लांब रांगा दुरचित्रवाहिन्यांवर पाहून पोटात कालवा कालव झाली. यावर उपाय योजला पाहिजे असे वाटू लागले. जर दुर्दैवाने कोरोना प्रादुर्भाव वाढला तर आपण नियंत्रित करू शकू काएकसे तीस करोड जनतेसाठी पुरेशी वैद्यकीय व्यवस्था उपलब्ध करणे शक्य आहे का? प्रशासन, पोलीस, कर्मचारी, डॉक्टर, सिस्टर सुद्धा मानवच आहे. ते तरी स्वतःचा जीव धोक्यात घालून किती दिवस सेवेस तत्पर असणार?
 मग या लांबच लांब रांगा टाळ्यायच्या कशा? तर ते अगदी सहज शक्य आहे. मागच्या काही वर्षात शासनाने सर्वच नागरिकांचे आधार  काढले असून ते बऱ्याच प्रमाणात त्यांच्या बँक खात्यांशी लिंक सुद्धा आहेत. तसेच ऑनलाइन व्यवहारांसाठी UPI व्यवस्था सुद्धा विकसित करण्यात आली आहे. तुलनेत ऑनलाइन व्यवहार वाढल्याचे दिसून येते. मात्र बरेच वयस्कर, गरीब तथा कमी शिक्षण असलेले नागरिक  ऑनलाइन व्यवहार करण्यास घाबरत असल्याने धजावत नाही. त्यांना आपल्या खात्यावरील रक्कम चोरीला जाईल की काय, आपण फसविले जातो की काय? अशी भीती सतावते.
बरं ही बाब आजवर दुर्लक्षित होती मात्र अशा अडचणीच्या वेळी तरी लोकांनी ऑनलाईन सेवेचा वापर केला पाहिजे. जेणेकरून संसर्ग टाळण्यासाठी मदत होईल. यासाठी संबंधित बँकांचे ऍप, गुगल पे, पेटीएम, अमेझॉन पे, फोन पे असे विविध ऍप अतिशय उपयुक्त व सुरक्षित असल्याचे पटवून दिले पाहिजे. इतर वेळी राजकारण असू शकतं मात्र आता आशा वेळी समाजपयोगी समाजकारण  करायला पुढाकार घेणे आपले आद्य कर्तव्यच आहे.
आपल्या आजूबाजूच्या अशा लोकांना सुरक्षिततेची काळजी घेऊन ऍप इंस्टोल करून देणे. बँक अकाउंट, बेनीफिशअरी ऍड करून देणे यासाठी ज्यांना माहीत आहे त्यांनी पुढाकार घेऊन लांबलचक रांगा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हे महत्वाचे काम करणे आवश्यक आहे. मात्र बऱ्याच खातेधारकांकडे एटीएम नसल्याने अडचण येऊ शकते, यावर खाते क्रमांक, शाखा, IFSC कोड टाकून सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधीत बँकांनी उपाययोजना केली पाहिजे. 
नुसताच व्हाट्सप, फेसबुकवर वेळ घालवण्यापेक्षा असं काही समाजासाठी योगदान देण्यासाठी तरुणांना तयार केले पाहिजे.
तसेच यापुढे जनधन खाते किंवा इतर कुठल्याही खात्यातून रक्कम काढण्यासाठी गर्दी होऊ नये. ग्राहक खातेधारकांनी आपल्या खात्यातील रक्कम परस्पर खरेदीसाठी वापरावी, यासाठी जास्तीत जास्त खातेधारकांनी ऑनलाईन सेवेचा वापर करण्याबाबतचे आवाहन तथा माहिती दूरचित्रवाहिन्यावर दाखवण्यात यावी. तसेच वर्तमानपत्र आणि शासन स्तरावर नागरिकांचे प्रबोधन करणे महत्वाचे ठरेल. असे मला वाटते.
सोमनाथ आवडाजी पगार, नाशिक
गीतकार/कवी, लेखक  (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com  somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद


गुरुवार, १८ जून, २०२०

अग! एकदाचा करूया धिंगाणा टन, टना, टना, टन, टना,टना II

*गीत:-अग! एकदाच करूया धिंगाणा*
*टन, टना, टना, टन, टना
कृपया,

https://youtube.com/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर  *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर  नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*

कुठवर झुरू माग माग फिरू
तुज वाचून ग! आता करमना
निवांत गाठूना दोघंच भेटुना
सजनी पिर्तीचं सोनं हे लुटुना
अग! एकदाचा करूया धिंगाणा
टन, टना, टना, टन, टना,टना Ilध्रुII

तो:- तुला भिजतांना पावसात पाहिलं
मन थाऱ्यावर माझं न राहिलं
माझ्या प्रित फुला न कळलं तुला
न कळलं मला जीव नादावला
स्वप्नी मी रमलो, झाला भास मना
विसरू कसा मी, हव्या, हव्या क्षणा ll१ll

तो:- रूप हे पाहून मी भाळून गेलो
तुझीया सजनी माग, माग आलो
ती:-तुझ्या साठी माझी फिगर ही झिरो
मी हिरोईन तुझी, तू माझा हिरो
तो:- मम्मीला, पप्पाला आवडली तु ना
ब्युटीफुल सून झालो मी दिवाना II२Il

*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com  
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

बुधवार, १७ जून, २०२०

शिवशंभू फिल्म्स निर्मित मराठी चित्रपटाचे फलक पूजन व उदघाटन युवा नेते सत्यजित नाईक (अण्णा) यांचे शुभ हस्ते संपन्न झाले, याप्रसंगी भाजपाचे शिराळा तालुका अध्यक्ष सुखदेव पाटील (तात्या), सिनेनिर्माते बाळासाहेब पाटील, दिग्दर्शक संतोष लोखंडे, अभिनेत्री सुनीता कांबळे, रितम पाटील, अर्चना गुरव, लेखक दत्ता पाटील (गिरजवडेकर), गीतकार सोमनाथ पगार, ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव चौगुले, जयंत पाटील आदी मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत


Image may contain: 12 people, people standing

मंगळवार, १६ जून, २०२०

कोरोना संदर्भातील अनुभव, विचार/ मनोगत

    कोरोना हे नाव फक्त उच्चारले तरी अंगावर काटे येतात. गेले काही दिवस जगभर धुमाकूळ घालणाऱ्या या व्हायरसचा चीनमधील वुहान शहरात उगम झाला. सुरवातीला फक्त वुहानमध्ये प्रादुर्भाव असणाऱ्या या विषाणूने सर्व जग आपल्या विळख्यात घेतले आहे. जगभर लाखो लोकांना संसर्ग झाला असून हजारो लोकं मृत्युमुखी पडले आहेत.
    उपाययोजना म्हणून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्या देऊन परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर भारताचे पंतप्रधान आदरनीय नरेंद्र मोदीजींनी रविवार दि. २२ मार्च २०२० रोजी सकाळी वाजेपासून रात्री वाजेपर्यंत जनता कर्फ्यु अर्थात जनता संचारबंदीचे आवाहन केले. सर्वांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. मात्र त्याच दिवशी सायंकाळी वा आपापल्या घरी, बाल्कनीत, दरवाजात टाळ्या वाजवत, टाळ, घंटी वाजवत कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी दिनरात कोरोना बाधितांवर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी, अत्यावश्यक उपाय योजना करणारे प्रशासन, अधिकारी तसेच इतर  सर्व कर्मचाऱ्यांप्रती आदर व्यक्त करण्याचे आवाहन केल्याप्रमाणे जनतेने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. मात्र काही उत्साही लोकांनी गर्दी केली. मिरवणूक काढली. अनेक लोकांनी एकत्र येत या घटनेला उत्सवाचे स्वरूप दिले. हि घटना निश्चितच लाजिरवाणी आहे. एकत्र येत गर्दी करणे म्हणजे कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावास आयतेच आमंत्रण देण्यासारखे आहे.
     त्यानंतर माननीय पंतप्रधानानी दि. २५ मार्च २०२० पासून पुढील एकवीस दिवस देशभर लॉकडाऊनची घोषणा केली. कोरोना व्हायरसला अटकाव करणे, संसर्गाची साखळी  खंडित करणे, पर्यायाने या व्हायरसचा संसर्ग आपल्या देशवाशीयांना होऊ नये. यादरम्यान जनतेने आपापल्या घरात  आहे तेथेच राहावे. हाच उद्देश होता.
    लॉकडाऊन जाहीर होताच लोकांनी घराबाहेर पडून अत्यावश्यक वस्तूंचा भरणा करण्यास सुरवात केली. परिणामी किराणा दुकाने, भाजी बजार आदी ठिकाणी गर्दी वाढली. लोकांनी अत्यावश्यक वस्तूंचा साठा केला तर दुकानांमध्ये वस्तूंच्या किंमती वाढल्याचे दिसून आले.
    दुकानांमध्ये गर्दीच्या ठिकाणी लोकं मास्क किंवा रुमाल तोंडावर बांधता बेफिकिरपणे संचार करतांना दिसत होती. काही महाभाग तर अंतर ठेवून उभं राहायला सांगणाऱ्याशी अथवा मास्क बांधायला लावणाऱ्यांशी हुज्जत घालायचे.  लोकांनी घरात सुरक्षित राहणे ऐवजी शतपावलीला जाणे, खरेदी करण्यास बाहेर पडणे. यास प्राधान्य दिल्याचे दिसत होते
      जनतेला अत्यावश्यक सेवा पुरवण्याच्या नावाखाली काही विक्रेते  फळे, भाजीपाला गल्ली बोळात तोंडाला रुमाल बांधता किंवा मास्क बांधता विकत फिरतांना दिसू लागले. नागरिकही बिनदिक्कतपणे कुठलीही सुरक्षितता बाळगता खरेदी करत होती. 'आमच्याकडे कोरोना नाही, आम्हाला काही होणार नाही'. अशा वलग्ना सहज ऐकायला मिळे. परदेशातून आलेले किंवा क्वारंटाईन केलेले लोकं प्रशासनाच्या आदेशाला जुमानता चोरून लपून बस किंवा रस्त्यावर दिसून आले. काही जागरूक नागरिकांनी त्यांना पकडूनही दिले.
    वारंवार सांगूनही काही ऐकत नसणाऱ्या माथेफिरू अतिशहाण्या लोकांना पोलिसांना दंडुक्यांनी प्रसाद दयावा लागला. जरी पोलिसांना लोकांनी नावं ठेवले तरी सुद्धा काही मूर्खांना सरळ करण्यासाठी दंडुके हाच एकमेव उपाय आहे. हेही तितकंच सत्य आहे.
      रोजगार नसल्याने बेरोजगार गावाकडे परतू लागल्याने त्यांना ठिक ठिकाणी अडवले गेले. गरीब, भिकारी यांचे हाल तर वर्णन करू शकत नाही.  त्याही कठीण परिस्थितीत काही दानशूर, काही सेवाभावी संस्था पोलिसांनी त्यांना अन्न पाणी पुरवले. पशु, पक्षी तर अन्न पाण्यासाठी सैरभैर झाल्याचे दिसले. अशा या बिकट समयीसुद्धा कुठेही थुकणारे, फिरणारे होतेच. या लोकांना साक्षात ब्रम्हदेव सांगायला आले तरी ते मुळीच ऐकणार नाहीत.
    सर्वात महत्त्वाचा मुद्दा नमूद करावा वाटतो की, जगभरातील देशी, विदेशी नागरिकांची स्थिती जैसे थे ठेवायला हवी होती. यावर पर्याय म्हणजे आपल्या देशातील विदेशींची काळजी आपण घेतली असती. तर परदेशातील आपल्या नागरिकांची काळजी तेथील प्रशासनाने घेतली असती. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या कोरोना बाधित प्रवाशांकडून होणारा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळता आला असता. मात्र तसे झाल्याने प्रादुर्भाव वाढल्याने नाहक स्थानिक गरीब जनतेला त्रास सहन करावा लागला. हेही तेवढेच सत्य आहे.
    सर्वांनी यापुढे एकविचाराने प्रशासनाचे निर्देश पाळूया. घरातच थांबून कोरोनाची साखळी खंडित करूया. त्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावावर मर्यादा येऊन कोरोना व्हायरसचे समूळ उच्चाटन होणे शक्य होईल. हिच सर्वांना नम्र विनंती.
                                    सोमनाथ आवडाजी पगार,