google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: 21 फेब्रु, 2022

सोमवार, २१ फेब्रुवारी, २०२२

आज २१ फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या निमित्ताने विद्याद्यार्थ्यांशी संवाद साधला यामित्ताने....

दरवर्षी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन २१ फेब्रुवारी रोजी जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. १७ नोव्हेंबर १९९९ ला युनेस्कोने हा दिवस "आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन" म्हणून जाहीर केला. आणि त्यानंतर २००० पासून आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन जगभरात शांतता तसेच बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्व मातृभाषांचे संरक्षण करण्यासाठी साजरा करण्यात येत आहे. नोव्हेंबर १९९९ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (यूनेस्को-UNESCO: United Nations Educational, Scientific and Cultural Organization) च्या जनरल कॉन्फरन्सने हा दिवस जाहीर केला. संयुक्त राष्ट्र महासभेने १६ मे २००९ रोजी जगभरात बोलल्या जाणार्या सर्व भाषांचे संरक्षण करण्यासाठी, तसेच यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी त्याच्या सदस्यांना राजी केले. ठराविक संकल्पनेत, बहुभाषिकता आणि बहुसंस्कृतीकरणाद्वारे विविधता आणि आंतरराष्ट्रीय समजूतदारतेतील एकता वाढवण्यासाठी जनरल असेंब्लीने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले.


जसे कि आपण जाणतो, भाषा हे आपल्या मूर्त, अमूर्त वारसाचे जतन तथा विकास करण्याचे सर्वात प्रभावी व शक्तिशाली माध्यम आहे. संयुक्त राष्ट्राकडून (UN) 2000 पासून या दिवसाचं सेलिब्रेशन सुरू झालं. आज झपाट्याने बदलत असलेल्या युगात अनेक जुन्या भाषा नष्ट होत आहेत. त्यामुळेच समाजात भाषेतील आणि संस्कृतीमधील विविधता जपण्यासाठी प्रयत्न केले जातात. दरवर्षी एका विशिष्ट थीमवर या दिवसाचं सेलिब्रेशन आधारित असतं, तसे उपक्रम सर्वत्र राबविले जातात. जगभरातील अनेक बोली भाषांचं अस्तित्त्व धोक्यात आलं आहे. जगभरातील शिक्षण व्यवस्थेमध्ये आज अत्यंत मोजक्या भाषांमध्ये शिक्षण उपलब्ध करून दिलं जात असल्याच आपल्या लक्षात येतं. मुलांच्या मानसिक व बौद्धिक विकासासाठी प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेमध्येच (Mother Tongue) दिलं जाणं आवश्यक आहे, असा मतप्रवाह असून यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुद्धा केले जात आहेत.

जागतिक मातृभाषा दिन साजरा केला जाण्याचं कारण,
१९४७ साली भारताची फाळणी होऊन भारत व पाकिस्तान या दोन देशांची झालेली निर्मिती हीच जागतिक मातृभाषा दिनाच्या निर्मितीच्या संकल्पनेचे मूळ आहे. भारत व पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानची राष्ट्रीय भाषा ही उर्दू असेल असे सांगण्यात आले. मात्र बांग्लादेशातील स्थानिकांना हे मान्य नव्हते. यासाठी त्यांनी मोहिम सुरु केली. आणि त्यानंतर 1956 साली बंगाली ही पाकिस्तानातील दुसरी अधिकृत भाषा मान्य झाली.

जगाच्या इतिहासात भाषेसाठी छेडण्यात आलेली ही विशेष मोहिम लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्राने स्थानिक भाषा आणि त्याचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी 21 फेब्रुवारी दिवशी जागतिक स्तरावर मातृभाषा दिन साजरा करण्याचं ठरवले. बांग्लादेशामध्ये 21 फेब्रुवारी हा दिवस Language Movement Day किंवा Shohid Dibosh म्हणून साजरा केला जातो. तर भारतामध्येही पश्चिम बंगालसह सर्व राज्यांमध्ये मातृभाषा दिन म्हणून 21 फेब्रुवारी हा दिवस साजरा केला जातो.

दरवर्षी भारत सरकार कडून जागतिक मातृभाषा दिनाचं औचित्य साधत खास उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.